Jump to content

पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/294

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आखली. त्यामुळे निदान रेशन व्यवस्थातरी चालू राहत होती. प्रख्यात समाजवादी नेते साथी अशोक मेहता त्यावेळी झङ ४८० पुरवठ्यावर कितपत भरवसा ठेवता येईल याचा तपास करण्यासाठी अमेरिकेत गेले होते. त्यांनी इ. ४८० म्हणून मिळणारा गहू बंद झाला तरी जागतिक बाजारपेठेत गहू अत्यंत मुबलक आणि स्वस्त भावात मिळत असल्यामुळे भारतीय शेतीकडे सद्भावना ठेवून दुर्लक्ष (सुग्ह नुतम्) करायला हरकत नाही अशी शिफारस केली. त्या काळच्या परिस्थितीत त्यात विचित्र वाटण्यासारखे काहीच नाही. स्वातंत्र्याच्या ५९ व्या वर्षी ४८० नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मुबलक गहू नाही, गव्हाची किंमत देशातील बाजारपेठेपेक्षा दीड पटीने जास्त आहे तरीसुद्धा केंद्रीय कृषिमंत्री मा. शरद पवार आणि त्यांचे संपुआतील साथीदार आयातीचे समर्थन करतच आहेत.

 नेहरू गेले, इंदिरा गांधी तयार होईपर्यंत तात्पुरते लाल बहादूर शास्त्रींना पंतप्रधानपदावर विराजमान करण्यात आले. आपली वेळ आली अशी इंदिरा गांधींची खात्री पटताच त्यांच्या उज्वल राजयोगामुळे लाल बहादूर शास्त्रींचे आकस्मिक निधन झाले; पण, या अल्पशा काळात शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या.

 जगभरच्या शास्त्रज्ञांनी गव्हाचे भरघोस पीक देणारे वाण तयार केले होते. मुबलक पाणी पुरवठा, रासायनिक खते आणि औषधे यांचा पर्याप्त उपयोग यांना भूमिती श्रेणीने प्रतिसाद देणारे हे वाण अनेक देशांत वापरले जात होते. भारतात ते आणावे किंवा नाही याची चर्चा चालू होती. साम्यवादी, समाजवादी आणि नेहरूवादी अक्रोशाने 'हरित क्रांतीतून रक्ताचे पाट वाहतील आणि लाल क्रांती येईल' अशा युक्तिवादाने या नव्या प्रयोगाला विरोध करीत होते.

 शेतकऱ्यांच्या सुदैवाने पाकिस्तानला दिग्गज नेहरू गेले, बटुमूर्ती लाल बहादूरशास्त्रांना अजून स्थिरस्थावर होता आलेले नाही याचा फायदा घेऊन काश्मिरवर हल्ला करण्याची दुर्बुद्धी झाली. लालबहादूर शास्त्रींनी त्या काळातही, देश सर्व बाजूंनी संकटाने घेरलेला असतांना जी हिम्मत दाखवली ती हिम्मत आजच्या 'महासत्ता (र्डीशिी झुंशी) असण्याची वल्गना करणाऱ्या भारताच्या पंतप्रधानांची होत नाही. किंबहुना 'इंडिया शायनिंग'वाल्या अटल बिहारी वाजपेयींचीही कारगील हल्ल्याच्या वेळी तशी हिम्मत झाली नाही. लाल बहादूर शास्त्रींनी 'काश्मिरातील प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडली गेली म्हणजे भारतावरच हल्ला झाला आहे' असे जाहिर करून भारत-पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सरहद्द ओलांडून भारतीय सैन्याला लाहोरकडे कूच करण्याचे आदेश दिले. अन्नधान्याच्या तुटवड्याला

भारतासाठी । २९४