पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/283

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दहा दिवसातच, संख्येने आणि ताकदीनेही प्रचंड क्षमतेच्या शत्रूलाही नामोहरम करतात. मुंबईकरांची वागणूक ही मधमाश्यांसारखी नाही हे स्पष्ट आहे.

 याची कारणे काय? मधमाश्यांना एक विशेष इंद्रिय आहे. त्यांच्या पोळ्यावर कोणी हल्ला केला तर तो कोणी केला हे हेरण्याचे त्यांना एक सहावे इंद्रिय आहे. आणि त्यांचे एकमेकांतील संदेशवहन कसे होते कोणास ठाऊक, पण एकदम पोळे जे उठते ते एकाच दिशेने जाऊन खोडी काढणाऱ्याच्या अंगाला भिडते.

 मुंबईकराला हे शक्य नाही. पहिले कारण असे की, मुंबईकरांवर होणारा हल्ला हा कोठून बाहेरून होत नाही, तर त्यांच्याच पोळ्यामध्ये एरवी उद्योगात असल्याचे दाखविणाऱ्या काही माश्या पोळ्यात उत्पात करण्याचा प्रयत्न करतात. त्या माश्यांना या उत्पाती माश्या कोण हे ठाऊकजरी असले तरी त्याविषयी बोलणे हे अनैतिक आहे, गैर आहे, एवढेच नव्हे तर, ते देशद्रोहासारखे आहे अशी, वर्षानुवर्षे एका विशिष्ट विचारसरणीमुळे मुंबईकरांची, मनाची घडण झाली आहे. त्यामुळे, हल्ला कोठून आला हे कळणे किंवा त्याबद्दल काही प्रतिकाराची कार्यवाही करणे हे संभवतच नाही.

 मुंबईच्या बाँबस्फोटानंतर आणखी एक विचित्र प्रकार अनुभवास आला. बहुसंख्य जमातीच्या सर्व नागरिकांना हल्लेखोरांची नावे माहीत असतानासुद्धा त्यांच्याविषयी समुदायवाचक आरोप करणे त्यांना भावले नाही. याउलट, ज्या समाजातून आतंकवादाला पोसले गेले त्या समाजाचे लोकच बहुसंख्य समाजावर आरोप करताना दिसले – 'खबरदार, कोणी आमच्या समाजाने ही अनन्वित कृत्ये केली असे म्हटले तर! हे जे काही होते आहे ते सगळे बाबरी मशीद पाडल्यामुळे आणि गुजरातमध्ये झालेल्या दंग्यांचीच प्रतिक्रिया आहे. त्याबद्दल अल्पसंख्य समजाला दोष देणे योग्य होणार नाही. 'सिमी'सारखी संस्था जबाबदार आहे असे केंद्रातील गृहमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतरसुद्धा उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री त्या संघटनेच्या समर्थनार्थ पुढे आले. आणि राज्याराज्यातील त्या अल्पसंख्याक जमातीच्या मुखंडांनी 'सिमी'ला वर्तणुकीची प्रशस्तिपत्रके देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी मुंबईला भेटीसाठी गेले असता त्यांनाच 'मुंबईत याला तर खबरदार' असा इशारा एका समाजवादी खासदारांनी दिला. 'उलटा चोर कोतवाल को डांटे' असा हा प्रकार मुंबई बाँबस्फोटानंतर दिसू लागला. 'असुनि खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला' अशी परिस्थिती पुन्हा एकदा तयार झाली आहे. थोड्याच दिवसांनंतर उत्तर प्रदेशात एक वेगळे मुस्लीम राज्य असावे अशी मागणी उघडपणे केली जाऊ लागली तर आश्चर्य

भारतासाठी । २८३