पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/249

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ती वापरण्याचा मोह झाला म्हणजे तर कमालच झाली.

 पुणे जिल्ह्यातील आंबेठाण येथे शेती सुरू केल्यानंतर काही वर्षांनंतर, १९७८ साली, 'इंडिया' आणि 'भारत' या सैद्धांतिक संज्ञांनी अभिप्रेत दोन समाजांमधील नववसाहती शोषणाच्या संदर्भात मी ही संकल्पना मांडली. 'इंडिया' आणि 'भारत' या सैद्धांतिक संज्ञा असून त्यांना भौगोलिक सीमा नाहीत हे स्पष्ट करून त्यांच्या सुस्पष्ट व्याख्या देण्याचा मी त्याचवेळी प्रयत्न केला. त्यानंतर अनेकांनी या शब्दप्रयोगांचा वापर केला पण अगदी चुकीच्या अर्थानी, मी केलेल्या व्याख्यांशी अजिबात ताळमेळ न राखणाऱ्या अर्थानी. कोणत्याही भौगोलिक सीमा नसणाऱ्या या दोन संज्ञांच्या स्पष्ट व्याख्या मी अशा केल्या : आंग्लाळलेल्या, तुलनेने सुस्थितीतील, ज्यांनी इंग्रजांनी जाताना मागे ठेवलेल्या शोषण यंत्रणेच्या साहाय्याने जनसामान्यांचे शोषण चालूच ठेवले त्यांचा समाज म्हणजे 'इंडिया' आणि इंग्रज राजवट संपली तरी ज्यांचे वसाहती स्वरूपाचे शोषण चालूच राहिले त्या बहुतांश ग्रमीण, शेतकरी, गरीब आणि मागासवर्गीयांचा समाज म्हणजे 'भारत'.

 ज्या ज्या लोकांनी 'इंडिया-भारत' हा शब्दप्रयोग वापरला त्यातील जवळजवळ सर्वांनी त्याला 'शहरी विरुद्ध ग्रमीण' असा त्याला अर्थ दिला; मी केलेल्या व्याख्यांपेक्षा अगदीच भिन्न. वास्तविक या सैद्धांतिक संज्ञांच्या व्याख्यांमध्ये अधिक स्पष्टता व काटेकोरपणा यावा असा प्रयत्न न चुकता अगदी सुरुवातीलाच मी केला आहे. सरकारी संरक्षणाच्या छत्राखाली बिगरशेती उद्योग व्यवसाय किंवा राजकारण करून धनिक झालेले ग्रमीण भागातील लोक हे 'इंडिया'चे भाग आहेत, तर शहरांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये आणि फूटपाथवर राहणारे गरीब हे 'भारता'तून जगण्यासाठी 'इंडिया'त आलेले निर्वासित आहेत असे मी त्यावेळीच स्पष्टपणे मांडले आहे. आजकालचे अनिवासी भारतीय जसे हिंदुस्थानच्या तुलनेने कितीतरी अधिक पगार मिळतो म्हणून परदेशात स्थायिक झाले आहेत त्याचप्रमाणे खेड्यांमध्ये जगणे मुश्किल झाले म्हणून तेथील लोक पोट भरण्यासाठी शहरांमध्ये येऊन राहिले. माक्सर् ने आपल्या 'ढु रवि ' या ग्रंथात आणि जर्मन तत्त्वज्ञानातही सामाजिक-आर्थिक भेदाचा ठपका शहरवासियांवर ठेवला आहे. महात्मा गांधींनीही या भेदांचा ठपका शहरांवरच ठेवला. इंग्रजी आमदनीतील गरीब आणि श्रीमंत समाजांतील दरी ही शेती आणि कारखानदारी या क्षेत्रांतील दरी आहे असे म्हणून त्याचा कडक शब्दात समाचार घेताना महात्माजींनी इंग्रज अधिकारी आणि शहरात राहणारे नेटिव्ह यांना जबाबदार धरले आणि म्हटले की, 'त्यांना एक ना एक दिवशी परमेश्वराच्या दरबारात आपल्या पापांचा झाडा द्यावा लागेल'. गरीब

भारतासाठी । २४९