पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होतात. इतकं या नोकऱ्यांचं आकर्षण वाढलं आहे.

 महाराष्ट्रामध्ये अगदी गावोगावीसुद्धा शेतमालाच्या भावाच्या कार्यक्रमाला शह देऊन शिवसेना ही पुढे येऊ शकली याचं कारण असं की शिवसेना ही नोकऱ्यांच्या प्रश्नाला जास्त प्राधान्य देते. आणि शेतकऱ्यांच्या मलांच्या मनातसद्धा, कधीकाळी शेतीमालाला भाव मिळेल, कधीकाळी शेती हा प्रतिष्ठेचा व्यवसाय होईल यापेक्षा आपल्याला जर कुठं पटकन नोकरी मिळून गेली तर आपले प्रश्न सुटतील आणि आपण या शेतीच्या चिखलातनं बाहेर पडून आनंदमय, सुखमय अशा मध्यमवर्गीय शहरी आयुष्यात प्रवेश करू अशी आशा कुठंतरी वाटत असते. त्यामुळे नोकरीच्या प्रश्नावर सर्वांच्याच भावना थोड्या तीव्र आहेत. आणि त्या नोकऱ्यांमध्ये ५० टक्के टक्के जागा आता यापुढे आपल्या सवर्ण वर्गाला बंद होणार, त्यातल्या त्यात सुधारलेल्या वर्गाला बंद होणार असं म्हटल्यावर विशेषतः विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राग राहावा, आधीच बेकारीचा काच, त्यात ५० टक्के जागा आपल्याला अ-प्राप्य असं झालं तर त्याबद्दल लोकांच्या भावना तीव्र व्हाव्यात हे साहजिकच आहे.

 मागासलेल्या जातीजमातींनी गेली हजारो वर्षे गुलामगिरीपेक्षाही खालचं असं आयुष्य कंठलं आहे. पन्नास टक्के राखीव जागांना आज विरोध होतो; पण हजारो वर्षे सर्व विद्येच्या साधनांमधल्या सर्व शंभर टक्के जागा या फक्त सवर्णांकरिताच खुल्या होत्या आणि बाकीच्या मागासवर्गियांना त्यात प्रवेश नव्हता हीही गोष्ट खरी आहे. केवळ शाळांचा प्रश्न नाही. सर्व शासन हे सवर्णांच्या हाती, एवढंच नव्हे तर काही जातीजमातींचा स्पर्श काय सावलीसुद्धा विटाळाची अशा परिस्थितीमध्ये या समाजाने अनेक वर्षे काढली. विद्या ही आपल्याकरता नसतेच; परमेश्वराने आपल्याला या जातीत जन्म दिला आहे तर याच पद्धतीनं कसंबसं हे आयुष्य कंठायचं; फार तर विरंगुळा म्हणून देवाचं नाव घ्यायचं अशा मानसिकतेमध्ये देशातला जवळजवळ तीन चतुर्थांश समाज जगत आला.

 त्यांच्याकरिता काहीतरी करणं आवश्यक आहे यात काही वाद नाही. पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये एक वाक्य वापरलं ते फार महत्त्वाचं आहे. पंतप्रधान म्हणाले की आर्थिक परिस्थिती बदलता येते, कालची गरीब माणसं आज बऱ्यापैकी होतात किंवा श्रीमंतही होतात; धर्मसुद्धा बदलता येतो; हिंदूंना मुसलमान होता येतं, मुसलमानाला ख्रिश्चन होता येतं,हिंदूंना ख्रिश्चन होता येतं. धर्मांतर करता येतं; पण जी कधी जात नाही ती खरी जातच राहते. हिंदू मुसलमान झाले

भारतासाठी । ११