१० शशीताईंच्या जीवनातून समजलेल्या गोष्टी
* जिव्हाळा, आपलेपणा आणि शिस्तीचा आग्रह एकच व्यक्ती करू शकते
* जीवनातली काही वर्ष तरी वंचितासोबत, वंचितांसारखे राहून त्यांच्याकडून जीवनाला सामोरे जाण्याचे धैर्य शिकणे महत्वाचे आहे
* मला जे मिळाले ते समाजाला परत करावे. ज्यांनी माझे आयुष्य समृद्ध केले, त्याबद्दल ऋणी राहणे
* कोणताही नवीन विषय अभ्यासाने शिकता येतो
* जे काम हाती घेतले ते व्यवस्थित विचारपूर्वक अभ्यासून, पूर्ण ताकदीने वेळेवर पूर्ण करणे
* आपले म्हणणे सोप्या पण प्रभावी भाषेत मांडणे
* कोणतीही संस्था असो ती स्वावलंबी पद्धतीने चालली पाहिजे
* सभासद आणि पदाधिकारी प्रशिक्षण हा प्रभावी स्वयंसहाय्य गट, संघ, सहकारी संस्था चालविण्याचा पाया आहे
* पारदर्शी कारभारासाठी योग्य निर्णयप्रक्रिया, आर्थिक व्यवहाराच्या योग्य नोंदी
* उत्तम कामगिरीसाठी - कामगिरीचे निकष ठरविणे, नियमित व नियोजित आढावा, उत्तम कामगिरी पुरस्कार या गोष्टी गरजेच्या आहेत