पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/4

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऋणनिर्देश

 सर्वप्रथम मी माझ्या शाळेची मैत्रीण रितू भार्गव हिच्याबद्दल मला वाटत असलेले ऋण व्यक्त करते. कारण तिनेच मला शशीताईंबद्दल लिहिण्यास प्रोत्साहित केले. माझी दुसरी एक मैत्रीण दीपा अय्यर हिने पुस्तक का लिहावे, कसे लिहावे ह्याची चिंतन प्रक्रिया पुढे नेली.

 शशीताईंच्या इच्छापत्रातून चैतन्य संस्थेसोबत ज्या संस्थांना त्यांच्या संपत्तीतील वाटा मिळाला त्या सर्वांनी आवर्जून शशीताईंबद्दल त्यांची मनोगते/आठवणी लिहून पाठवल्या. या संस्था आहेत, १. “एकल नारी महिला संघ', उदयपूरच्या पद्मश्री जिनी श्रीवास्तव, २. सहकार विकास फौंडेशन (सी.डी.एफ.-सहविकास) आंध्र प्रदेशच्या जयाप्रदाताई आणि लक्ष्मण भाऊ, ३. गुरुकुल बोटॅनिकल सँक्च्युअरी सोसायटी, वायनाड, केरळच्या सुप्रभाताई, ४. सेंटर फॉर इंडीजीनस नॉलेज सिस्टीम, (सी.आय.के.एस.) चेन्नईचे डॉ.बाळकृष्ण. या निमित्ताने या सहप्रवासींबरोबर 'चैतन्य'चे नाते पुन्हा घट्ट झाले.

 शशीताईंच्या सोबत काम केलेल्या रमाताई, श्यामला नटराजन आणि नंदिता रे यांनी त्यांच्या आठवणी लिहून पाठवल्या. एपिमासने (आंध्रप्रदेश महिला अभिवृद्धी संगम) शशीताईंच्या स्मरणाप्रीत्यर्थ, २२ ऑक्टोबर २०११ रोजी स्वावलंबी सहकारी संस्था ह्या विषयावर घेतलेल्या सभेचा अहवाल पाठवला. अॅक्सेस लाइव्हलीहूड कन्सल्टन्सीचे श्री.जी.व्ही. कृष्णगोपाल, प्रा.आर.श्रीराम, डॉ.संजीव चोप्रा यांनी, शशीताईंवर आणि उष:प्रभा पागे यांनी सुप्रभा शेषन यांच्यावर लिहिलेल्या लेखांचा उपयोग करण्याची परवानगी दिली.

 ग्रामीण महिला संघाच्या कार्यकर्ता म्हणून काम करत असलेल्या सुवर्णाताई लोणारी यांनी, महिलांच्या नजरेतून, विशेषतः सोप्या भाषेत, व पदाधिकारी म्हणून काम करत असलेल्या निलोफरताईंनी, पुस्तिकेतील महत्त्वाचे जे मुद्दे पुढे आणले, ते मुद्दाम ठळक अक्षरात दिले आहेत.

 स्व. विद्याताई बाळ यांनी प्रोत्साहन दिले तसेच उज्वला मेहंदळेनी संपादन केले. अश्विनीताई बर्वे, वसुधाताई सरदार, शिरीष जोशी आणि डॉ. कविता साळुके, हेरंब कुलकर्णी, विजया चौहान, सुवर्णा लोणारी, नवनाथ लोढे, 'चैतन्य'च्या विश्वस्त, जान्हवी अंधारीया, डॉ. नाना उर्फ एस. व्ही. गोरे, सुवर्णा गोखले, डॉ. अश्विनी घोरपडे, सिमांतिनी खोत, सुबोध कुलकर्णी ह्यांनी दिलेल्या मौलिक सूचनांमुळे ह्या पुस्तिकेच्या गुणवत्तेत भर पडली. रश्मी भुवड /वायंगणकर यांचा हे लेखन पूर्ण करण्यामध्ये, खूपच महत्त्वाचा वाटा आहे. नीलम, तेजश्री ह्यांनी हे लेखन, पुस्तिका स्वरूपात आणण्यासाठी सहकार्य केले. सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करते.

 "प्रबोध संपदा' यांनी पुस्तकाची संगणकावर सुरेख मांडणी केली. सीआयएसचे सुबोध कुलकर्णी आणि विकिपीडिया संपादक कल्याणी कोतकर यांनी हे पुस्तक विकिमिडिया कॉमन्स या मुक्त ज्ञानस्त्रोतात अपलोड करण्यासाठी सहाय्य केले.या दोघांचेही मन:पूर्वक आभार. रेखाताई श्रोत्रीय, कल्पनाताई पंत आणि इतर 'चैतन्य' विश्वस्तांनी ह्या कामाला सातत्याने अव्यक्त प्रोत्साहन दिले. सर्व कार्यकर्त्यांनी पण ह्या वाटचालीत जो सहभाग दिला त्याबद्दल मी त्यांच्या ऋणातच राहू इच्छिते.

- सुधा कोठारी

❖❖❖
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन