अंगारवाटा...शोध शरद जोशींचा/परिशिष्ट १ : शरद जोशी जीवनपट : शंभर प्रमुख घटना
Appearance
परिशिष्ट-१
शरद जोशी जीवनपट : शंभर प्रमुख घटना
क्रमांक | दिनांक | घटना |
---|---|---|
१ | ३ सप्टेंबर १९३५ | सातारा येथे जन्म |
२ | ६ जून १९५१ | पार्ले टिळक विद्यालय, मुंबई, येथून अकरावीची परीक्षा उत्तीर्ण |
३ | २८ जून १९५७ | सिडनम महाविद्यालय, मुंबई, येथून एम.कॉम. उत्तीर्ण |
४ | १ ऑगस्ट १९५८ | भारतीय टपाल खात्यातील नोकरी सुरू |
५ | २५ जून १९६१ | मुंबईच्या लीला कोनकर यांच्याशी विवाह |
६ | ७ एप्रिल १९६२ | ज्येष्ठ कन्या श्रेया यांचा जन्म |
७ | २३ नोव्हेंबर १९६३ | कनिष्ठ कन्या गौरी यांचा जन्म |
८ | २० ऑगस्ट १९६७ | फ्रान्समधील सात महिन्यांचे प्रशिक्षण सुरू |
९ | ३० एप्रिल १९६८ | भारतीय टपालखात्यातील नोकरीचा राजीनामा |
१० | १ मे १९६८ | युनिव्हर्सल पोस्टल युनियन, स्वित्झर्लंड, येथे रूजू |
११ | १ मे १९७६ | स्वित्झर्लंडमधील नोकरी सोडून भारतात परत |
१२ | १ जानेवारी १९७७ | आंबेठाण, तालुका खेड, येथे शेतीला सुरुवात |
१३ | २५ मार्च १९७८ | चाकण येथील पहिले कांदा आंदोलन |
१४ | ८ ऑगस्ट १९७९ | शेतकरी संघटना स्थापन |
१५ | ३ नोव्हेंबर १९७९ | 'वारकरी' साप्ताहिक सुरू |
१६ | २४ जानेवारी १९८० | वांद्रे-चाकण रस्त्यासाठी ६४ किलोमीटर महामोर्चा |
१७ | १ मार्च १९८० | पुन्हा कांदा आंदोलन. पहिले रास्ता रोको. |
१८ | ८ मार्च १९८० | पहिले बेमुदत उपोषण सुरू |
१९ | १६ मार्च १९८० | वाढीव भावाने कांदा खरेदी सुरू. आंदोलनाची यशस्वी सांगता. उपोषण समाप्त. |
२० | ६ एप्रिल १९८० | आळंदी येथे पहिले कार्यकर्ता शिबिर सुरू |
२१ | ३ मे १९८० | पोलिसांकडून पहिली अटक. आत्महत्येचा आरोप. |
२२ | १५ ऑगस्ट १९८० | निफाड येथे ऊस आंदोलनाला सुरुवात |
२३ | ९ ऑक्टोबर १९८० | निफाड सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत उसाला ३०० रुपये टन हा भाव मिळायला हवा असा ठराव संमत |
२४ | १० नोव्हेंबर १९८० | खेरवाडी येथील 'रेल रोको'मध्ये दोन शेतकरी पोलीस गोळीबारात हुतात्मा. संघटनेतर्फे हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा होतो. |
२५ | ११ नोव्हेंबर १९८० | नाशिक कोर्टात शरद जोशी यांना हजर केले गेले. इतर ३१,००० शेतकरीही अटकेत |
२६ | २७ नोव्हेंबर १९८० | मुख्यमंत्री अंतुले यांच्याकडून टनाला रुपये ३०० हा भाव मंजूर |
२७ | १४ डिसेंबर १९८० | पिंपळगाव बसवंत येथे विजय मेळावा |
२८ | १ फेब्रुवारी १९८१ | निपाणीतील सुभाष जोशी यांच्यासमवेत पहिली सभा |
२९ | २४ फेब्रुवारी १९८१ | तंबाखू शेतकरी व विडी कामगार यांची निपाणीत पहिली संयुक्त सभा. सात प्रमुख मागण्या सादर. |
३० | २६ फेब्रुवारी १९८१ | अंबाजोगाई येथे प्रशिक्षण शिबिर सुरू |
३१ | १४ मार्च १९८१ | निपाणी तंबाखू आंदोलन सुरू, १५,००० शेतकरी 'रास्ता रोको'त सामील. |
३२ | ६ एप्रिल १९८१ | पोलिस गोळीबारात १२ शेतकरी हुतात्मे. शरद जोशी बेल्लारी तुरुंगात. |
३३ | १ जानेवारी १९८२ | संघटनेचे सटाणा येथील पहिले अधिवेशन सुरू. खुल्या अधिवेशनाला तीन लाख शेतकरी हजर. |
३४ | २८ मे १९८२ | पंजाबातील 'भारती किसान युनियन'ची बैठक |
३५ | २८ जून १९८२ | महाराष्ट्रात दूध आंदोलन सुरू. चार दिवसांनी माघार. |
३६ | ३० ऑक्टोबर १९८२ | वर्धा येथे देशभरातील शेतकरी प्रतिनिधींचा मेळावा व 'आंतरराज्य समन्वय समिती'ची स्थापना |
३७ | ३१ ऑक्टोबर १९८२ | पत्नी लीला जोशी यांचे पुणे येथे निधन |
३८ | २० फेब्रुवारी १९८३ | 'शेतकरी संघटना - विचार आणि कार्यपद्धती','प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश' व 'भारतीय शेतीची पराधीनता' ही पुस्तके प्रकाशित |
३९ | ६ एप्रिल १९८३ | 'शेतकरी संघटक' पाक्षिक सुरू |
४० | १६ नोव्हेंबर १९८३ | पंढरपूर येथे 'विठोबाला साकडे' मेळाव्यात कृषिमूल्य आयोग बरखास्तीची मागणी |
४१ | १२ मार्च १९८४ | चंडीगढ येथील राजभवन वेढा सुरू. इतर राज्यांतील प्रतिनिधींसह एक लाख शेतकरी सहभागी. |
४२ | १८ मार्च १९८४ | चंडीगढच्या परेड ग्राउंडवर विजयोत्सव |
४३ | २७ मे १९८४ | संघटनेची पहिली कार्यकारिणी नाशिक येथे स्थापन |
४४ | २ ऑक्टोबर १९८४ | गुजरात व महाराष्ट्रभर प्रचारयात्रा सुरू |
४५ | ३१ ऑक्टोबर १९८४ | टेहेरे येथे यात्रासमारोप, तीन लाख शेतकऱ्यांचा मेळावा. |
४६ | २२ नोव्हेंबर १९८४ | पुणे येथील बैठकीत राजकीय भूमिकेवर निर्णय |
४७ | २१ जानेवारी १९८५ | धुळे अधिवेशन, सर्व राजकीय पक्षांना शेतीमाल
भावाविषयी भूमिका मांडण्यासाठी निमंत्रण. |
४८ | २ ऑक्टोबर १९८५ | राजीवस्त्रविरोधी आंदोलन सुरू. महाराष्ट्रभर एकूण
२५० ठिकाणी राजीवस्त्रांची होळी. |
४९ | ६ ऑक्टोबर १९८५ | राहुरी येथे उस परिषद. चरणसिंग, शरद पवार, प्रमोद महाजन इत्यादि राजकीय नेत्यांची हजेरी. |
५० | १२ डिसेंबर १९८५ | मुंबई येथे दत्ता सामंत यांच्यासमवेत पहिला शेतकरी कामगार मेळावा. राजीवस्त्रांची जाहीर होळी. |
५१ | २३ जानेवारी १९८६ | आंबेठाण येथे असताना हृदयविकाराचा पहिला झटका |
५२ | २ ऑक्टोबर १९८६ | अकोला येथे कपास किसान संमेलन |
५३ | ९ नोव्हेंबर १९८६ | चांदवड येथील पहिले महिला अधिवेशन. खुल्या अधिवेशनात तीन लाख महिलांचा सहभाग. |
५४ | ७ डिसेंबर १९८६ | राजीवस्त्रांवर 'ठप्पा मारो' आंदोलन. हुतात्मा बाबू गेनू स्मृती सप्ताह सुरू. |
५५ | १० डिसेंबर १९८६ | कपाशी आंदोलनात सुरेगाव, जिल्हा हिंगोली, येथे पोलीस गोळीबारात तीन शेतकरी ठार |
५६ | १२ डिसेंबर १९८६ | वर्धा येथील रेल रोको. विदर्भात ६०,००० तर मराठवाड्यात ३०,००० शेतकरी तुरुंगात. |
५७ | १५ फेब्रुवारी १९८७ | २५,००० शेतकरी मुंबईतील चौपाटीवर दाखल. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन. |
५८ | १६ जानेवारी १९८८ | सांगली येथे व्ही. पी. सिंग यांच्या उपस्थितीत मेळावा |
५९ | १८ एप्रिल १९८८ | जळगाव येथे शेतकऱ्यांचा राजा शिवाजी व दलितांचा कैवारी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा मेळावा. कर्जमुक्ती आंदोलनाची घोषणा. |
६० | १ मे १९८९ | दारू दुकान बंदी आंदोलन सुरू |
६१ | ३ जुलै १९८९ | महिला आघाडीचे जिल्हा परिषद कब्जा आंदोलन |
६२ | २ ऑक्टोबर १९८९ | बोट क्लब, नवी दिल्ली, येथे पाच लाखांचा किसान जवान मेळावा. महेंद्रसिंग टिकैत यांनी उधळून दिलेला. |
६३ | ८ नोव्हेंबर १९८९ | अमरावती येथे महिला आघाडीचे दुसरे अधिवेशन. शेतकरी महिलांच्या संपत्ती अधिकारासाठी 'मंगल सावकाराचे देणे फेडण्याचे आवाहन. जातीयवादी घटकांना गावबंदी करण्याचा निर्णय. |
६४ | ३१ डिसेंबर १९८९ | दिल्ली येथे किसान समन्वय समितीची बैठक, नवनिर्वाचित पंतप्रधान व्ही. पी. सिंग व उपपंतप्रधान देवी लाल उपस्थित. |
६५ | २ जानेवारी १९९० | महाराष्ट्राच्या २६ जिल्ह्यांमधून 'अर्थवादी चळवळीला क्षुद्रवादाचा धोका' समजावून सांगण्यासाठी फुले आंबेडकर विचारयात्रा सुरू |
६६ | १४ मार्च १९९० | व्ही. पी. सिंग यांनी शरद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी सल्लागार समिती स्थापन केली |
६७ | २ ऑक्टोबर १९९० | लक्ष्मी मुक्ती अभियान सुरू. जमिनीची मालकी शेतकरी महिलांच्याही नावे व्हावी ह्यासाठी. |
६८ | १० नोव्हेंबर १९९१ | शेगाव येथील शेतकरी मेळाव्यात चतुरंग शेतीची योजना. खुल्या अर्थव्यवस्थेचे स्वागत. |
६९ | ३१ मार्च १९९३ | डंकेल प्रस्तावाच्या स्वागतासाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांचा 'आर्थिक मुक्ती मोर्चा' |
७० | २९ ऑक्टोबर १९९३ | औरंगाबाद अधिवेशनात डंकेल प्रस्तावाला जाहीर पाठिंबा व 'चतुरंग शेती'च्या अंमलबजावणीसाठी 'शिवार ॲग्रो प्रा. लि. कंपनीची घोषणा |
७१ | ६ नोव्हेंबर १९९४ | नागपूर येथे स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना |
७२ | १३ मार्च १९९५ | हिंगणघाट (वर्धा) व बिलोली (नांदेड) येथून विधानसभा निवडणुकीत पराभूत. |
७३ | ८ एप्रिल १९९५ | हैदराबाद येथे ॲन्जिओप्लास्टी |
७४ | १० डिसेंबर १९९५ | कापूस एकाधिकार खरेदीच्या विरोधात स्वातंत्र्य यात्रा. नरखेड येथे समारोप व तेथून मध्य प्रदेशातील पांढुर्णामार्गे कापूस सीमापार आंदोलन. |
७५ | १४ डिसेंबर १९९५ | औरंगाबाद येथे ऊस झोनबंदी विरोधात उपोषण सुरू. |
७६ | २७ एप्रिल १९९६ | नांदेड लोकसभा मतदार संघातून लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी. पराभूत. |
७७ | ४ एप्रिल १९९७ | पंजाब व हरियाणामधील गव्हाच्या भावाचे आंदोलन. |
७८ | ९ ऑगस्ट १९९७ | 'Q' आंदोलन सुरू. 'नोकरदार चले जाव', 'भ्रष्टाचार चले जाव' |
७९ | ५ जून १९९८ | इस्लामपूर (सांगली) येथे शेतकरी संघटनेतर्फे आयोजित ग्रामीण साहित्य संमेलन |
८० | १० डिसेंबर १९९८ | स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त अमरावती येथे जनसंसद सुरू |
८१ | २० डिसेंबर १९९८ | पुण्याहून दिल्लीला जाताना विमानातच अर्धांगवायूचा झटका. शरीराची डावी बाजू कमकुवत झाली. |
८२ | १२ मार्च १९९९ | शेतकऱ्यांची कंपनी स्थापन करून औद्योगिकीकरणासाठी 'भामा उद्योगनगरी'चे बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन |
८३ | ५ एप्रिल १९९९ | मुंबईत बॉम्बे हॉस्पिटल येथे बायपास सर्जरी |
८४ | ४ डिसेंबर १९९९ | गुजरातमधील नर्मदा जन आंदोलन |
८५ | १० जानेवारी २००० | जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) महानिदेशक माईक मूर यांची दिल्ली येथे भेट शेतकऱ्यांवर लादलेल्या उणे सबसिडीची माहिती दिली |
८६ | १२ सप्टेंबर २००० | जोशींच्या अध्यक्षतेखाली अटल बिहारी वाजपेयी यांच्यातर्फे कृषी कार्य बल स्थापन |
८७ | ६ एप्रिल २००१ | नवी दिल्ली येथील नेहरू स्टेडियमवर 'किसान कुंभ' भरवून शेतकरी स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित |
८८ | १५ नोव्हेंबर २००२ | तीन महिन्यांच्या नर्मदा परिक्रमेला सुरुवात |
८९ | २८ मे २००३ | शिवाजी पार्क, मुंबई येथे स्वतंत्र भारत पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन सुरू |
९० | ३० जानेवारी २००४ | स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी शेणगाव (अमरावती) ते कोराडी (नागपूर) पदयात्रा सुरू |
९१ | ७ जुलै २००४ | सहा वर्षांसाठीचे राज्यसभा सदस्यत्व सुरू |
९२ | ३१ डिसेंबर २००७ | रामेश्वरम येथे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे ह्या मागणीसाठी मेळावा. सर्व कर्जाचे कागदपत्र समुद्रात बुडवण्यात आले. |
९३ | २ जुलै २००८ | कोल्हापूर येथे इथेनॉल शिबीर सुरू |
९४ | ९ मार्च २०१० | सरकारने मांडलेल्या 'महिला आरक्षण विधेयका'तील आरक्षित जागा ठरवण्याची आवर्तनी सोडतीची तरतूद लोकशाहीला घातक आहे म्हणून राज्यसभेत एकट्याचे विरोधी मतदान (१८६ विरुद्ध १) |
९५ | २ ऑक्टोबर २०१० | रावेरी, जिल्हा यवतमाळ, येथील पुनर्निर्मित सीतामंदिराचा लोकार्पण समारंभ |
९६ | १० फेब्रुवारी २०११ | दिल्ली येथे 'अन्नसुरक्षा' या विषयावरील आंतराष्ट्रीय
परिसंवादासाठी गेले असताना हॉटेलच्या जिन्यावरून पडल्याने जखमी. हालचालींवर खूप मर्यादा. |
९७ | ३० जुलै २०१२ | बांदा, बुंदेलखंड, येथे किसान समन्वय समितीची
बैठक. जोशी उपस्थित असलेली शेवटची. |
९८ | ८ नोव्हेंबर २०१३ | चंद्रपूर येथे शेतकरी संघटनेचे बारावे अधिवेशन.
'पुन्हा एकदा उत्तम शेती' ही घोषणा. जोशी उपस्थित असलेले शेवटचे अधिवेशन. |
९९ | २५ नोव्हेंबर २०१४ | मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली. शेवटचा जाहीर कार्यक्रम. |
१०० | १२ डिसेंबर २०१५ | पुणे येथे निधन. |